#मी टू..

नाना,आलोकनाथ,विकास बहल, चेतन भगत....आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते सर्वच.... विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्नच? शेतकरी विधवा स्त्रियांना मदत,प्रकाश आमटेंची भूमिका साकारणारे नाना की तनुश्री दत्ता ने आरोप केले ते नाना,हे खरे की ते?? दिव्याखाली अंधार हे जसं सत्य..तसंच बॉलिवूड च्या झगमगाटात पण काळं वास्तव आहे हे सत्यच.. मुद्दा फक्त बॉलीवूड पुरताच नाही.कॉर्पोरेट,मीडिया हाऊसेस,प्रशासन,राजकारण आणि बरीच क्षेत्र पकडला तो चोर हाच न्याय असेल तर अनेक चोर पकडलेच जात नाही त्यांचं काय?? नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय,स्त्री शक्तीची पूजा करण्याचा सण...?? की फक्त दिखावा च? 'स्त्री-सबलीकरण' हे नाव क्रांतिकारक वाटत असलं तरी, राजकीय लोकांनी त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी उभा केलेला एक भंपकपणाच...वास्तविकता फारच निराळी.. 'मी टू'च्या निमित्ताने स्त्रिया बोलताहेत त्यांना अनेक स्तरांतून पाठिंबा मिळतोय हे मात्र आश्वासक. तरी मूलभूत प्रश्न उरतातच,पुरुषप्रधान मानसिकता पूर्णच नाहीशी व्हायला अजून किती पिढ्या जायला लागणार कुणास ठाऊक? सुसंस्कृत,उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या समाजात स्त्रियांच्या...