#मी टू..
नाना,आलोकनाथ,विकास बहल, चेतन भगत....आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते सर्वच....
विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्नच? शेतकरी विधवा स्त्रियांना मदत,प्रकाश आमटेंची भूमिका साकारणारे नाना की तनुश्री दत्ता ने आरोप केले ते नाना,हे खरे की ते??
दिव्याखाली अंधार हे जसं सत्य..तसंच बॉलिवूड च्या झगमगाटात पण काळं वास्तव आहे हे सत्यच..
मुद्दा फक्त बॉलीवूड पुरताच नाही.कॉर्पोरेट,मीडिया हाऊसेस,प्रशासन,राजकारण आणि बरीच क्षेत्र पकडला तो चोर हाच न्याय असेल तर अनेक चोर पकडलेच जात नाही त्यांचं काय??
नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय,स्त्री शक्तीची पूजा करण्याचा सण...?? की फक्त दिखावा च?
'स्त्री-सबलीकरण' हे नाव क्रांतिकारक वाटत असलं तरी, राजकीय लोकांनी त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी उभा केलेला एक भंपकपणाच...वास्तविकता फारच निराळी..
'मी टू'च्या निमित्ताने स्त्रिया बोलताहेत त्यांना अनेक स्तरांतून पाठिंबा मिळतोय हे मात्र आश्वासक.
तरी मूलभूत प्रश्न उरतातच,पुरुषप्रधान मानसिकता पूर्णच नाहीशी व्हायला अजून किती पिढ्या जायला लागणार कुणास ठाऊक? सुसंस्कृत,उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या समाजात स्त्रियांच्या चरित्राशी
इतक्या सराईत पणे खेळलं जात असेल तर दुर्लक्षित,वंचित,ग्रामीण स्त्रियांच्या समस्यांबद्दल कल्पनाच न केलेली बरी.खरं तर 'नो मीन्स् नो' हा फक्त एक फिल्मी डायलॉग च न राहता वास्तविकतेत रुजनारी
एक स्ट्रिक्ट वॉर्निंग असायला हवी.पुरुषी सत्तेला आव्हान देणाऱ्या या मोहिमेने अनेकांची झोप उडवली हे निश्चित.काळानुरूप स्त्रियांनी त्यांची सक्षमता सर्वच क्षेत्रात सिद्ध केली आहेच,अलीकडेच भारतीय नौदलाच्या आय एन एस तारीणी या मोहिमेअंतर्गत महिलांनी पृथ्वीची समुद्रिपरिक्रमा पूर्ण केली.महिला सक्षम असण्याचं याहून सुंदर उदाहरण नाही.
मी टू चा वापर दुधारी शस्त्रासारखा होऊ शकतो,काही सभ्य पुरुषांचं चरित्र हनन केलं जातंय हा आरोप होतोय.यात काही प्रमाणात तथ्य असेलही,म्हणून सर्वच स्त्रिया चुकीचेच आरोप करतात असा अर्थ होत नाही. मुळात हा स्त्रिया विरुद्ध पुरुष असा वाद नाहीच, सशक्त समाज घडवण्यासाठी एकमेकांच्या बाजूने उभं राहीलच पाहिजे.मी टू च्या निमित्ताने समाजाच्या अतिशय वरच्या स्तरातील स्त्रियांच्या अन्यायाला वाचा फुटली,पण सर्वसामान्य स्त्रिया अन्याय सहन करण्यातच धन्यता मानतात, त्या देखील बोलत्या झाल्या पाहिजेत.तरंच या मोहिमेला काही यश आलं असं म्हणता येईल.
शेवटी काय..?
आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्याच्या या उत्सव काळात....
आपल्याला सावित्रीच्या मागे उभा राहणारा कणखर जोतिबा व्हायचंय?,
की वस्त्रहरण करणारा दुर्योधन व्हायचंय?....हे ज्यानं त्यानं ठरवावं..!!
- अविनाश.
विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्नच? शेतकरी विधवा स्त्रियांना मदत,प्रकाश आमटेंची भूमिका साकारणारे नाना की तनुश्री दत्ता ने आरोप केले ते नाना,हे खरे की ते??
दिव्याखाली अंधार हे जसं सत्य..तसंच बॉलिवूड च्या झगमगाटात पण काळं वास्तव आहे हे सत्यच..
मुद्दा फक्त बॉलीवूड पुरताच नाही.कॉर्पोरेट,मीडिया हाऊसेस,प्रशासन,राजकारण आणि बरीच क्षेत्र पकडला तो चोर हाच न्याय असेल तर अनेक चोर पकडलेच जात नाही त्यांचं काय??
नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय,स्त्री शक्तीची पूजा करण्याचा सण...?? की फक्त दिखावा च?
'स्त्री-सबलीकरण' हे नाव क्रांतिकारक वाटत असलं तरी, राजकीय लोकांनी त्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी उभा केलेला एक भंपकपणाच...वास्तविकता फारच निराळी..
'मी टू'च्या निमित्ताने स्त्रिया बोलताहेत त्यांना अनेक स्तरांतून पाठिंबा मिळतोय हे मात्र आश्वासक.
तरी मूलभूत प्रश्न उरतातच,पुरुषप्रधान मानसिकता पूर्णच नाहीशी व्हायला अजून किती पिढ्या जायला लागणार कुणास ठाऊक? सुसंस्कृत,उच्चभ्रू म्हणवल्या जाणाऱ्या समाजात स्त्रियांच्या चरित्राशी
इतक्या सराईत पणे खेळलं जात असेल तर दुर्लक्षित,वंचित,ग्रामीण स्त्रियांच्या समस्यांबद्दल कल्पनाच न केलेली बरी.खरं तर 'नो मीन्स् नो' हा फक्त एक फिल्मी डायलॉग च न राहता वास्तविकतेत रुजनारी
एक स्ट्रिक्ट वॉर्निंग असायला हवी.पुरुषी सत्तेला आव्हान देणाऱ्या या मोहिमेने अनेकांची झोप उडवली हे निश्चित.काळानुरूप स्त्रियांनी त्यांची सक्षमता सर्वच क्षेत्रात सिद्ध केली आहेच,अलीकडेच भारतीय नौदलाच्या आय एन एस तारीणी या मोहिमेअंतर्गत महिलांनी पृथ्वीची समुद्रिपरिक्रमा पूर्ण केली.महिला सक्षम असण्याचं याहून सुंदर उदाहरण नाही.
मी टू चा वापर दुधारी शस्त्रासारखा होऊ शकतो,काही सभ्य पुरुषांचं चरित्र हनन केलं जातंय हा आरोप होतोय.यात काही प्रमाणात तथ्य असेलही,म्हणून सर्वच स्त्रिया चुकीचेच आरोप करतात असा अर्थ होत नाही. मुळात हा स्त्रिया विरुद्ध पुरुष असा वाद नाहीच, सशक्त समाज घडवण्यासाठी एकमेकांच्या बाजूने उभं राहीलच पाहिजे.मी टू च्या निमित्ताने समाजाच्या अतिशय वरच्या स्तरातील स्त्रियांच्या अन्यायाला वाचा फुटली,पण सर्वसामान्य स्त्रिया अन्याय सहन करण्यातच धन्यता मानतात, त्या देखील बोलत्या झाल्या पाहिजेत.तरंच या मोहिमेला काही यश आलं असं म्हणता येईल.
शेवटी काय..?
आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा करण्याच्या या उत्सव काळात....
आपल्याला सावित्रीच्या मागे उभा राहणारा कणखर जोतिबा व्हायचंय?,
की वस्त्रहरण करणारा दुर्योधन व्हायचंय?....हे ज्यानं त्यानं ठरवावं..!!
- अविनाश.
Khup chan👍👍
ReplyDelete🙏🙏🙏
Delete